Posts

Showing posts from June, 2026

जनतेच्या विश्वासाचा दीपस्तंभ, सहजीवनाचा आदर्श आणि निष्ठेच्या नात्यांची सुवर्णगाथा

Image
माजी आमदार पुरुषोत्तमभाऊ राजगुरू व सौ. सीमाताई राजगुरू यांच्या लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त... राजकारण हे केवळ पद, प्रतिष्ठा आणि सत्तेचे क्षेत्र नसते; ते माणसे जोडण्याचे, नाती जपण्याचे आणि विश्वास कमावण्याचे क्षेत्र असते. आयुष्याच्या प्रवासात अनेक सहप्रवासी भेटतात, अनेक चेहरे येतात-जातात, परंतु काही नाती अशी असतात जी काळाच्या कसोटीवर अधिक उजळून निघतात. अशा नात्यांच्या, संघर्षांच्या, यशाच्या आणि समर्पणाच्या सुवर्ण इतिहासाला आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार पुरुषोत्तमभाऊ राजगुरू आणि सौ. सीमाताई राजगुरू यांचा हा सहजीवन प्रवास म्हणजे प्रेम, त्याग, विश्वास आणि निष्ठेच्या धाग्यांनी विणलेली एक प्रेरणादायी गाथा आहे. चार दशकांचा हा प्रवास केवळ संसाराचा इतिहास नाही, तर समाजकारण, राजकारण, अध्यात्म आणि मानवी मूल्यांचा एक जिवंत दस्तऐवज आहे. पुरुषोत्तमभाऊ राजगुरू हे नाव वाशिम जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आदराने घेतले जाते. भारतीय जनता पक्षाशी अखंड निष्ठा राखत, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आणि सर्व स्तरांतील लोकांना सोबत घेऊन चालत त्यांनी जनतेच्या मनात कायमचे ...

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

Image
शासन नियम एक सांगतात, प्रशासन दुसरे; अनुकंपा नियुक्तीच्या फाईलमध्ये नेमकं पाणी कुठे मुरलं? मंगरूळपीर | सुधाकर चौधरी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तातडीचा आधार मिळावा म्हणून अस्तित्वात आलेली अनुकंपा नियुक्ती योजना मंगरूळपीरमध्ये मात्र १४ वर्षांच्या प्रतीक्षेची शिक्षा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल १४ वर्षे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अविनाश काशिनाथ इंगळे यांनी अखेर नगर परिषद कार्यालयासमोर प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनुकंपा ज्येष्ठता यादीत नाव, शासन निर्णयांचा आधार, रिक्त पदांची उपलब्धता आणि पात्रतेबाबतचा दावा असूनही नियुक्ती होत नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. १४ वर्षांची प्रतीक्षा; पण न्यायाचा पत्ता नाही वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आधार मिळावा म्हणून अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्यात आला. मात्र एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही नियुक्ती मिळालेली नाही. या काळात अर्ज, निवेदने, कार्यालयीन फेऱ्या, वरिष्ठांकडे पा...